मागच्या आठवड्यात सगळ्यांची आवडती "चांदणी" अर्थात अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुःखद निधन झालं..
आणि ठीक त्याच दिवशी भारत - पाक सीमेवर पाकिस्तान ने शस्त्रसंधी चे उल्लंघन करून भ्याड गोळीबार केला आणि त्यात आपले २ वीर जवान हुतात्मा झाले..
सगळ्यांची आवडती म्हणण्यामागचं कारण एवढंच कि आठवडा उलटल्यानंतर सुद्धा श्रीदेवी च्या मृत्यू च्या चर्चा अजून हि कायम आहेत.. आणि प्रत्येक जण यात काहींनाकाही योगदान देतोय...
आणि याच श्रेय जात ते आपल्या "लोकशाही चा चौथा खांब - प्रसार माध्यमं" यांना..
श्रीदेवी च्या मृत्यूच्या दुःखद घटनेचं प्रसार माध्यमांनी जे "सोहळ्यात" रूपांतर केलं त्याला खरंच काही तोडच नाही...
मग त्यात वेळो वेळी येणारी ब्रेकिंग न्यूज..
म्हणजे बोनी कपूर ने केलेला सरप्राईज डिनर प्लॅन..
त्यात अचानक झालेला, रहस्यमय असा श्रीदेवी चा मृत्यू..
नंतर आलेला पोस्टमार्टम रिपोर्ट..
आणि मग परत मृत्यू नेमका कसा झाला...? श्रीदेवी ला कोणी मारलं..? असे असंख्य प्रश्न
बोनी कपूर ची दुबई मध्ये होणारी चौकशी..
मुलीच्या चित्रपट प्रदर्शना आधीच घडलेला योगायोग..
अर्जुन कपूर चे डोळे हि "सावत्र आई" साठी पाणावले..
श्रीदेवी च पार्थिव दुबई वरून कधी येणार..
त्यासाठी अंबानींनी केलेली स्पेशल प्लेन ची व्यवस्था..
आणि अखेर पार्थिव विमानतळावर दाखल...
त्यात मग सुप्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी श्रीदेवी च्या पार्थिवाला "बॉडी" म्हणल्याने केलेला ट्विटर वार...
अनिल कपूर विमानतळावर पोहोचले..
त्यानंतर ऍम्ब्युलन्स चा पाठलाग करणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या गाड्या....
सरते शेवटी पार्थिव घरी पोहोचले...
त्यानंतर सेलेब्रेटींची अंत्य दर्शनासाठी लागलेली रीघ...
मग सरकारी इतमामात होणार श्रीदेवी वर अंत्य संस्कार..
हे झाल्यावर असं वाटलं आता हे कुठं तरी थांबलं पाहिजे.. आणि थांबेल अशी अपेक्षा होती..
पण नाही... पुन्हा एक दिवस सगळ्या ठळक घटनांचा मागोवा घ्यायला आपले प्रसारमाध्यमं सरसावले नसते तर नवलच..
आपल्या ह्या लोकशाहीच्या चौथ्या खांबाने मग "श्रीदेवीच्या रहस्यमय रोमांचक १० घटना" ह्या मथळ्याखाली पुन्हा २ दिवस त्याची पारायणं सुरु केली...
खरंच हे पाहून मन अस्वस्थ होत होतं ..
त्यावेळी अशी जाणीव झाली कि राज्यासमोर, देशासमोर आणि जगासमोर भेडसावणारा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणजे "श्रीदेवी"..
मग त्या घटनेने सगळं काही मागे पडलं..
सीमेवर होणार गोळीबार.. त्यात शहीद होणारे, मातृभूमीसाठी हौतात्म्य पत्करणारे - वीर सुपुत्र..
करोडो रुपयांचे झोल करून देशाबाहेर जाणारे "घोटाळेबाज"
आणि काही हजारांचे कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या करणारा आमचा अन्नदाता, गरीब शेतकरी "राजा"
मग त्यावेळी घरातला कर्ता पुरुष गमावल्यावर काळाचा आघात झेलणारे त्याचे कुटुंबीय..
सगळं, सगळं काही शून्य होतं ह्यापुढे...
ह्या दुःखद घटनेचे इतके लेटेस्ट अपडेट देऊन "सोहळ्यात" रूपांतर करण्याची गरज होती का.. ?
त्या ४ दिवसात खरंच बाकी काहीच महत्वाचं न्हवत.. ?
शेतकऱ्यांची होणारी कुचंबणा, सीमेवर होणारा गोळीबार, बँकामध्ये होणारे कोट्यवधींचे घोटाळे ह्या सगळ्यांपेक्षा "ह्या" ब्रेकिंग न्यूज अति महत्वाच्या होत्या का.. ?
खरंच सैनीकांच्या शहादत, अन्नदात्या शेतकऱ्याच्या आत्महत्त्या पेक्षा सेलिब्रेटी च मरणं इतकं महत्वाचं असावं... ?
शेवटी TRP च्या रस्सीखेचात आणि आपल्या बिजनेस च्या ग्रोथ मध्ये कशाला किती महत्व द्यावं हे हि समजू नये. ?
असे आणि अश्या अनेक प्रश्नांनी माझ्या मनात वादळ निर्माण झालं..
म्हणूनच अस वाटतंय कि "खांबाला कुठेतरी तडे जातायेत"..
No comments:
Post a Comment